वंदे मातरम् सामूहिकरित्या म्हणायला कठीण आहे त्यामुळे ते राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात अडचण येत होती म्हणून मास्तर कृष्णरावांनी मिश्र झिंझोटी रागात सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना सामूहिकरित्या म्हणता येईल अशी सोपी चाल वंदे मातरम् गीतास लावली.
हे गीत जरी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही तरी ते भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (national song) म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यास राष्ट्रगीता इतकाच समान बहुमान देण्यात आला. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात मास्तरांनी चाल देऊन गायलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड भारतात विशेषतः महाराष्ट्रात सभासमारंभात, शाळा, महाविद्यालये अशा ठिकठिकाणी वाजवली जायची.